चारोळ्या
सारखं खोटं बोलणं
खूप धोक्याचं असतं
सारखं खरं बोलणं
खूप चांगलं नसतं
खरं सांगायचं नाही
खोटं बोलायचं नाही
मग करू तरी काय -
तेपण कळेना काही
जगात बरंच काही
हाती काहीच लागेना
माझ्या हातीपण खूप -
पण हाती कां येईना ?
प्रेमात पडलो, आणि
सारं सारं विसरलो
मी कोण, कुठल्या जगी -
हेपण मी विसरलो
आपले शेजार हेच -
आपले ऋणानुबंध
सुखापेक्षा दुःखातच -
जोडू पाहती संबंध
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments