@ चारोळ्या @
टीकेला जो जो टिकतो
तोच टिकून राहतो!
जो घाबरूत जगतो -
तो जगूच ना शकतो !
या जगात कुणालाही -
त्रास न देता जगावं !
आणि जाता जातापण -
कल्याण करीत जावं !
कितीही सरळ चाला -
वळण घ्यावं लागतं !
वळणाविना जगणं -
जीण्यालायक नसतं !
समजून घेणा-यात -
कुणी तरी हवा एक !
समजून न घेणारे -
जगी तसे लाखोंलोक !
माणसं वाचत जाता -
एकेक वेचत जावं !
काही वेचक वेधक -
आपल्याकडं ठेवावं !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना . कामून )
मो .नं . ०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments