Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा कवी सूर्यकांत कामून यांची रचना



 चारोळ्या 


कलियुगातला वाल्मिकी -

वाल्या ' वाल्याच 'राहिला !

रामायणातला वाल्या -

वाल्याचा ' वाल्मिकी 'झाला !


सरकार म्हणते की-

गरिबांचं राज्य आहे !

मग गरिबांवरच -

अन्याय कां होतो आहे ?


आज जिकडे तिकडे -

गुंड आणि बदमाश !

सरकारच पोसते -

म्हणून हा सर्वनाश !


अन्न परब्रह्म आहे -

आज सारे विसरले !

अन्नाऐवजी सगळे -

मातीच खाऊ लागले !


दगडच खूप भारी -

कधी ना विरघळतो !

काळही कुठला असो -

कधीच ना बदलतो !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो .नं . 07620540722

Post a Comment

0 Comments