चारोळ्या
आग लावतोय त्याला -
कुठे माहित असतं ?
हवाच बदलली की -
आपलंही राख होतं !
सांगायचं तसं खूप -
सांगायचंच असतं !
पण आपला इमान-
सांगाया देत नसतं !
काहीपण करा पण -
योग्य तेच तुम्ही करा !
तुमच्या कर्तृत्त्वावर -
जगाच्या क्रुर नजरा !
आपल्याला वाटते की -
सारे आपल्याजवळ !
आपणा कळत नाही -
कां ते आपल्याजवळ ?
काय पाहू ,काय नको -
सौंदर्यच नष्ट झाले !
नको ते दृश्य पाहून -
डोळे कायमचे गेले !
@ कवी - सूर्यांबिका ,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments