चारोळ्या
हे जगही बदलले -
नीतीमत्ता बदलली !
भाकरीच्या जागी पोळी-
आणि चव बिघडली !
खोटे किती बोलावेत-
त्यालाही मर्यादा आहे !
पण सध्याचा जमाना -
खोट्यांनी चालतो आहे !
कायद्याचं राज्य नाही -
कायदा गाढव झाला !
कायद्याने चालणारा -
कायदा मोडू लागला !
स्रियांच स्रियांच्या आज -
इतक्या कां हाडवैरी ?
आजच्या या स्रियांपेक्षा -
रामाची कैकयी बरी !
आजचा पुरूष आज -
पुरूषागत वागेना -
पुरूष असूनपण -
नपुसकाच्याच खुणा !
@ कवी- सूर्यांबिका ,सोलापूर
( सूर्यकांत ना . कामून )
मो .नं . 07620550722
Post a Comment
0 Comments