चारोळ्या
प्रत्येक फुलांचा जसा
गंध नि वास वेगळा
प्रत्येक माणसांचाही -
तसा स्वभाव वेगळा
दिवस जाते कामात
रात्र पूर्ण विचारात
मन मरताना मात्र -
शरीर जातं खंगत
दृष्टीकोन बदलता -
जीवनही बदलतं
हवं तसं जगायला
जगणं सोपं करतं
आपलं चालत नाही
तिथं कशाला थांबावं ?
आपलं चालतं तिथं
जीव आपलं ओतावं
कुठंतरी कधीतरी
काहीतरी होत जातं
परंतु काय होतंय-
कधी कळत नसतं
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
0मो.नं.07620540722

Post a Comment
0 Comments