चारोळ्या
मन हळवं असावं
दुबळं मात्र नसावं
कठीण प्रसंगी पण -
सामोरे जाण्या शिकावं
डोळे भरून बघता
डोळेच भरून आले
आत्ताच्या डोळ्यात माझ्या -
डोळाभर तूच झाले
मनात ठरवलं की -
सारं काही शक्य होतं
नसेल इच्छा आकांक्षा-
जीण्याला काय किंमत ?
अंधार कोळून प्यालो
तरी उजेडच नाही
लख्ख उजेड तरीही -
अंधार कां जात नाही ?
कुणी बोलायचे नाही
कुणी हसायचे नाही
डोळे वटारूनपण -
कुणी पहायचे नाही
@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722
Post a Comment
0 Comments