चारोळ्या
प्रत्येक माणूस आज -
सुखाचाच शोध घेतो
दुःख येते म्हणताच-
पळ कां काढू पाहतो ?
असे कितीदा मरता - ?
आत्ता तरी जागे व्हावे
जगायचेच असेल -
तर पेटून उठावे
जे काही होत असते
ते कुणा दिसत नाही
जे कधी घडत नाही
तिथेच कां लक्ष जाई ?
नका देऊ दोष कुणा -
नका कुणालाही शिक्षा
जो तो भोगतोच आहे
आपल्या कर्माची शिक्षा
चांगला माणूस होणे
माणूसच विसरला
नको त्या संगती जात -
स्वतःलाही विसरला
@ कवी - सूर्यांबिका ,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं .0 7620540722

Post a Comment
0 Comments