चारोळ्या
आपलं आपल्यावर -
नसते कधी विश्वास !
दुसरे सांगितले की -
ठेवतो आम्ही विश्वास !
प्रेम असेल तरच -
जगण्याला अर्थ आहे !
प्रेमाविना जगातलं -
जगणंच व्यर्थ आहे !
येताना आणत नाही -
जातानाही नेत नाही !
स्वतःसाठी इतरांना -
सदा मी कां जाळू पाही ?
जीव असेल तरच -
जीवाला जिवंतपणा !
मन असेल तरच -
मनाला मोकळेपणा !
कुणाला म्हणू चांगलं -
कुणाला म्हणू वाईट ?
सगळे एकसारखे -
कुणा म्हणू मी वाईट ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं .०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments