चारोळ्या
जुन्याचा नको विसर -
नव्याचे करू स्वागत !
गेले त्याची खंत नको -
नव्यात आणू वसंत !
वर्ष संपले म्हणजे -
वर्ष नवे येणारच !
नव्याच्या स्वागतक्षणी -
जुन्याला कां द्यावे ठेच ?
वेळ आपला अमूल्य -
आपणा ठाव असावे !
कुणा किती वेळ द्यावे -
आपणच ठरवावे !
कुणा काय करायचे -
बिनधास्त करू द्यात !
आपल्यात किती बळ -
लढताना होई ज्ञात !
प्रश्नांना उत्तर आहे -
पण विचारतो कोण ?
प्रश्नांकितच चेहरे -
उत्तरात आहे कोण ?
@ कवी - सूर्यांबिका , सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments