चारोळ्या
जगी सर्वांच्याच ओठी -
आज विषाचाच पेला !
अमृतात न्हाऊनही -
गोडच होईना झाला !
वासुकीत विष भारी -
परंतु नसते गर्व !
विंचूत थेंबच विष -
परंतु गर्वच गर्व !
फुलें अंथरून झाली -
काटेंही सारून झाली !
अंधार जरी चौफेर -
उजेडाने उजळली !
सज्जन म्हणतो पण -
सज्जनही बिघडले !
चोरांच्या नादी लागून -
बेपर्वा जिंदगी केले !
चांगलं आणि वाईट
संगतीचा परिणाम !
जसं आपण वागतो -
तसं तिचा परिणाम !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो . नं .07620540722

Post a Comment
0 Comments