चारोळ्या
सैफ वाचला, परंतु -
महाराष्ट्र कुठे सेफ ?
मुख्यमंत्री सांगतात -
महाराष्ट्र खूप सेफ !
सुसंस्कृत महाराष्ट्र -
समंजस महाराष्ट्र !
आज कुठे कां दिसेना -
शांत, सभ्य महाराष्ट्र ?
पट्टीचे ते बोलणारे -
पट्टीचे ते लिहिणारे !
पट्टीचे ते लढणारे -
आज गेले कुठे सारे ?
आम्ही भाकर मागता -
ते धर्म विचारतात !
धर्म सांगितलं तर -
आमचं पोट भरतं ?
जगी मुर्खांचा बाजार -
मुर्खांची जास्त चलती !
मुर्खाच्या राज्यात मग -
शहाणे कसे चालती ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722
Post a Comment
0 Comments