चारोळ्या
डोळस असूनपण -
सगळेच अंध कसे ?
शिकले-सवरलेले -
काहीच बोलेना कसे ?
सगळेच्या सगळेच -
आज बुध्दिभ्रष्ट झाले !
बुध्दी असून युध्दाला -
चालना देत राहिले !
जगी कायमस्वरुपी -
असं काहीच नसतं !
एक ना एक दिवस -
निघून जाणं असतं !
चांगलं वागलो तेंव्हा-
कुणा बघवलं नाही !
वाईट वागलो तर -
डोक्यावरच कां घेई ?
राज्यात काय चाललं -
सगळेच जाणतात !
परंतु थांबवायला -
कुणी कसे जाईनात ?
जिथे शोधायला हवे -
तिथे शोधत नाहीत !
नको त्या ठिकाणी मात्र -
शोधायला कां जातात ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना . कामून )
मो.नं . ०७६२०५४०७२२
Post a Comment
0 Comments