चारोळ्या
सांगणारे सांगतात -
लोकांना खूप काहींसे !
ऐकणारे ऐकूनही -
कानाडोळा करी कसे ?
सारे बदलले तरी -
हरकत नाही काही !
आपण आपली नीती -
बदलू नये कधीही !
आपणच आपल्यांना -
आपले खूप मानतो !
आपले मात्र आपणां -
कधी मानत नसतो !
किंतू काहीपण असो -
हेतू चांगला असावा !
चांगल्या कामी आपला -
देह झिजत ठेवावा !
असं नाही तसं नाही -
सारे सांगू पाहतात !
असंच आहे म्हणून -
कुणी कधी सांगतात ?
@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर
(सूर्यकांत ना .कामून )
मो.नं.०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments