Type Here to Get Search Results !

साप्ताहिक उद्याचा शिलेदार कविंच्या दुनियेत चला आमच्यासोबत वाचा आजच्या चारोळ्या



 चारोळ्या 


जगात आलो म्हणजे -

येऊन जाणे नसते !

काही सत्कर्में करून -

आपणां जाणे असते !


चौदानंतर माणूस -

अति मंदच कां झाला ?

तत्पूर्वी माणूस मात्र -

माणसासवे ना जगला ?


सोयीनुसार चालते -

आजचे राजकारण !

मेल्याचे ना दुःख ,पण -

सुखांत राजकारण !


छत्तीस कोटी देवही -

काही करणार नाही !

आज जे चाललं आहे ते -

कुणी रोखणार नाही !


खरे बोलता आपणां -

हरिश्चंद्र आठवतो !

खोटंच बोलला तर -

अंधभक्त आठवतो !


नैतिकतेपेक्षा सध्या -

रणनीती महत्वाची !

खुर्ची टिकविणे हीच -

मंत्र्यांची नीती आजची !

@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर

( सूर्यकांत ना .कामून )

मो.नं.०७६२०५४०७२२

Post a Comment

0 Comments