चारोळ्या
एकट्याने केले तर -
काही साध्य होत नाही !
एकत्रित केल्यानेच -
खूप काही होत राही !
आजची रात्रच काय -
दिवसपण वै-याची !
यापुढे जगणेपण -
वाटते खूप धोक्याची !
स्वतःला आवडलं की -
हवं ते करता येतं !
तसं जर कां झालं की -
मनासारखं घडतं !
श्वासपण उपरंच -
जगणंही उपरंच !
जगून काय करावं -
जगपण उपरंच !
तोडलं , मोडलं तरी-
निसर्ग पुन्हा फुलतं !
तसं आपलं जीवन -
फुलून यावं म्हणतं !
@ कवी - सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं. 07620540722

Post a Comment
0 Comments