चारोळ्या
चांगलं वाईट काय -
खरं काय खोटं काय ?
खरं कळूनदेखील -
खोटंच बोलावे काय?
माणूस म्हणून आलो -
माणूसच नाही झालो !
माणूस म्हणूनपण -
ओळखू येईना झालो !
जगात मी आलो पण -
जगणेच नाकारलो !
जगाचे जीणे पाहून -
जगही सोडून दिलो !
जगायचं नाही तर -
कसंही कां जगायचं ?
जगायचं आहे तर -
जगून दाखवायचं !
विचार बदललं की-
वृत्तीपण बदलेल !
आपण कसे वागलो -
तेंव्हा जगाही कळेल !
जुनं तर नेहमीच -
अस्सल सोनं असतं !
उद्याला जुनेच पुन्हा -
फिरून येत असतं !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना.कामून )
मो.नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments