चारोळ्या
सारं काही हरूनही
जिंकल्याचाच कां भास ?
जिंकून पण चेहरा
कां वाटावेसे उदास ?
जगी वावरण्याआधी
चेहरा आपला शोधा
कुठला आपला खरा
कुठला सरळ साधा ?
आहे तसे जगून घ्या
जगणे हेच जीवन
जगण्यात खरी मजा
दाखवा उपभोगून
काही नवे, काही जुने
रोजच येती आठव
असे किती म्हणून मी -
मनी रोज साठवावं ?
ना घर आपलं होतं
ना ती माणसे आपली
तरी आपले म्हणून
धरावी किती सावली ?
कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments