चारोळ्या
गांधी जगाला कळलं
आम्हांसि अजून नाही
गांधींना ओळखण्याची -
आपलीच कां चूक ही ?
विदेशात गांधी प्रिय
भारतात कां अप्रिय ?
गांधी इतका संघर्ष
सांगा कुणी केलं काय ?
देश निधर्मी म्हणतो
धर्मात विष कशाला ?
माणूस म्हणून जगी -
माणूस पुसून गेला
आज देश बिघडला
समाजही दुभंगला
माणसातला माणूस
कुठे दिसेनासा झाला
वाघाच्या पंजात , कधी -
मगरीच्या जबड्यात
देश आपला आजचा
रोज नव्या संकटात
कवी - सूर्यांबिका, सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments