चारोळ्या
जे काही चाललं आहे
चुकीचं चाललं आहे !
बरोबर असूनही -
चुकीचे कां म्हणती हे ?
सांगायचं खूप होतं -
पण सांगू न शकलो !
सांगितलं नाही हेच -
आज मी बरं म्हणालो !
रोज नवाच तमाशा -
रोज नवेच नाटक !
कधी येते सुख पाठी -
कधी पाठोपाठ दुःख !
चोहोबाजूला माणसे -
आजूबाजूला माणसे !
माझ्या चौफेर माणसे -
कळेना कशी माणसे ?
माणसात वागूनही -
माणूस मज कळेना !
माणूस ओळखू कसं -
तेपण कुणी सांगेना !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722

Post a Comment
0 Comments