चारोळ्या
पूर्वी जगच आपला -
जग चालवत होता !
आजचं जग आपलं -
पैसा चालवी पुरता !
जगी आज सगळेच -
खोटी नाती जपतात !
आपलेपणाची नाती -
सांगाल कोण जपत ?
दोघांचे होता भांडण -
आपला होतो माकड !
भांडण मिटेल तेंव्हा -
समजा गोडच गोड !
आज तितकाच राग -
तितकाच पुन्हा त्रास !
कालवर सोसलेलं -
कां आठवते दिवस ?
घाईघाईची जिंदगी -
घाईघाईचं जगणं !
फुरसतीनं जगाया -
वेळ मी आणू कुठून ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना . कामून )
मो .नं .०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments