चारोळ्या
खोटं दुपारपर्यंत -
सगळं विकलं होतं !
सांजवेळ झाली तरी -
सुख बसूनच होतं !
ऐकणं सोडून दिलं -
पाहणं सोडून दिलं !
आत्ताचं जग पाहता -
सांगणं सोडून दिलं !
जेंव्हा केंव्हा दुःख येतं -
तेंव्हा रडवून जातं !
खरं तर दुःखामुळं -
जगणं शिकता येतं !
कुठल्यापण गोष्टीला -
वेळच यावी लागते !
खरंखोटं कळायला -
वेळच सांगू पाहते !
आपल्यापेक्षा लोकांना -
बरंच काही कळतं !
आपण चुकतो तेंव्हा -
लोकांना आधी कळतं !
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो .नं . 07620540722
Post a Comment
0 Comments