चारोळ्या
झाडे बहरून आली
पानेपण शहारली !
आत्ता मुक्या वाटापण -
बेफाम बोलू लागली !
हसलो कधी फसलो
कधी जिंकून हरलो !
मान-अपमान मात्र -
कधीच ना मी पाहिलो !
आज जे घडले आहे -
उद्या घडत नसते !
आजचे आज असते -
उद्याचे और असते !
नसता कुणा काळजी -
कां जाळावेत काळीज ?
आपले काळीज बघा -
किती काळजीत आहे ?
तुला पाहून आजही -
न पाहिल्याचे वाटते !
ओळख गाढ तरीही -
ओळखूच कां न येते ?
तुला पाहता पाहता -
खूप लिहिल्या कविता !
प्रत्यक्ष जीवनी मात्र -
जन्मा न आली कविता !
@ कवी -सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो.नं.०७६२०५४०७२२
Post a Comment
0 Comments