चारोळ्या
जग आपले म्हणून -
जगाशी नाते जोडलो !
नाते हजारोंं, परंतु -
कुठेही ना मी जोडलो !
जगात आलो मी पण -
कुणाचा कुणी ना झालो !
कुणाचा ना मी मुलगा -
ना कुणाचा बाप झालो ?
उजेडात असताना -
सगळे भेटाया आले !
आज अंधारात येता -
कुणी विचारेना झाले !
राज्य सुरक्षित नाही
नेते मात्र आलिशान !
गरिबांच्या जीवनात -
क्षणाक्षणाला मरण !
राज्यात चाललं काय -
कुणा कां कळेना झालं ?
नेत्यांचे घरचे मात्र -
सुखासुखी चांगभलं !
चोरांचा रोज बाजार
कोट्यांनी रोज खरेदी
चोरांच्या राजवटीत -
सज्जन येणार कधी ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना .कामून )
मो.नं. ०७६२०५४०७२२

Post a Comment
0 Comments