चारोळ्या
संतोषची क्रूर हत्त्या -
राज्याचीच बेईज्जती !
राज्याचे मंत्रीमंडळ -
गुंडांची कां वाडीवस्ती ?
संतोषच्या हत्त्येमुळे
महाराष्ट्र हादरला !
आपले समस्त मंत्री -
गळ्यात घालून गळा !
मुंडेंच्या राजीनाम्याने -
प्रश्न सुटणार नाही !
अजुनी हजारों मुंडे -
वागती मजेत दाही !
राज्यात आज सर्वत्र -
दुःशासन - धुतराष्ट्र !
यापुढे दिसेल कसा -
सुसंस्कृत महाराष्ट्र ?
वाल्मिक कराड आत -
मुंडेच कसे बाहेर ?
वरदहस्त कुणाचे -
सांगा अजित पवार ?
इतके घडूनपण -
देवेंद्र थांबले कसे ?
हाती सूत्रे असताना -
दुर्लक्ष केलेच कसे ?
असेच घडते तर -
राज्य वाचेलही कसे ?
सर्वसामान्य जनता -
जगतील तरी कसे ?
@ कवी - सूर्यांबिका,सोलापूर
( सूर्यकांत ना.कामून )
मो.नं.07620540722

Post a Comment
0 Comments